सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
बारामती तालुक्यातील होळ प्रथिमिक केंद्रात काल आणि आज आलेली २०० लस शहरातील आय टी मुलांनी ऑनलाईन बुक केल्याने बारामती तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना हात हलवत परत जावे लागले आहे. नोंदणी डिजिटल तर आम्हाला लस कधी ? असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. कुणी लस देता का लस अशी आर्त साद नागरीक करत आहेत. तर या ऑनलाईन च्या गुतुड्यात प्रशासन देखील हतबल होताना दिसत आहे.
कोरोनाची परिस्थिती सध्या सगळीकडे गंभीर आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
पहिल्या डोस गावामध्ये घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस घेण्याची वेळ आली परंतु लस कमी प्रमाणात येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथे लस ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. त्यामुळे आपल्याला दुसरा घ्यायचा या साठी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ कडे अनेकांनी धाव घेतली.
तसेच वयवर्ष १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली. होळच्या लसीकरण केंद्रावर सकाळी रांगा लावल्या. परंतु ऑनलाईन नोंदणी मध्ये केंद्र निश्चित झाले नसल्याने लस मिळणार नाही.याची खात्री तरूण वर्गास सह इतरांना केंद्रावर गेल्यावर समजल्याने नाराजीतर झालीच आणि आता काय करायचे हे समजत नसल्याने गोंधळून गेले. कारण गावांमध्ये होणाऱ्या लसीकरण मोहिमेत लसीकरण असलेल्या ठिकाणी आधार आणि मोबाईल असले तर तत्काळ नोंदणी आणि त्याच जागेवर लस मिळते अशी वस्तुस्थिती आहे. याच माहीतीच्या आधारावर नागरिक लस घेण्यासाठी होळ येथे आले होते.
होळ च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठ्या मोठ्या आलिशान गाड्यातून पुण्यातून आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्र निश्चित केल्याने त्यांना लस मिळणार याची खात्री झाल्याने त्यांनी पुण्याहून येऊन नंबर लावले. आणि लस सुद्धा घेऊन पुन्हा आलिशान गाडीतून गेले. लस घेण्यासाठी डीजीटल पोर्टल आहे. ते ठराविक वेळेत उघडते. त्याच वेळी आपली नाव नोंदणी झाली आणि लसीकरण केंद्र निश्चित झाले तरच लस मिळते या गोष्टी माहिती असल्याने शंभर डोस आलेल्या होळ च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुण्यातून नंबर लावून आलेल्या नागरिकांना लस देणे क्रमप्राप्त ठरले. यात शेतकरी, रोजदारी करणारे यांचे डिजिटल नंबर लावून घेण्यात मागे पडले. त्यांनी रांगा लावल्या त्या फेल ठरल्या. गावात आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर घेऊन गेले की लस मिळते .ती साधी सोप्पी प्रोसेस किचकट बनल्याने लस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्याचा हेलपाटा पडत आहे.
लस घेण्यासाठी या डीजीटल असलेल्या प्रोसेस मध्ये बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागात अनेकांना नोंदणी करण्याची प्रोसेस माहीत नाही.त्यामुळे लस घेण्या पासून दूर राहत आहेत. यात बदल करून साधी आणि सोप्पी प्रोसेस करावी.लसीची उपलब्धता सुद्धा अधिक होयला हवी.ग्रामीण भागातील नागरिकांचा विचार करून लस नोदणी करण्यासाठी प्रक्रिया राबविले गेले पाहिजे. असे मत ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केले.
COMMENTS