सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या मात्र आता परवा दि १ रोजी पुन्हा रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकिय स्तरावरून दुजोरा देण्यात आला आहे.
राज्य शासनाने राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांसाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. तसेच नगरपालिका व नगरपरिषदेच्या देखील निवडणुला जाहीर केल्या आहेत. मात्र साखर कारखान्याच्या निवडणुला लागणार का? याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. उद्या दि ३१ रोजी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
फेब्रुवारी २०२१ नंतर कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे राज्यातल्या सर्वच निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका ३१ ऑगस्ट नंतर होणार? की पुन्हा लांबणीवर पडणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
निवडणुकांना राज्य शासनाने ३१ ऑगस्ट ही मुदत वाढ दिलेली होती. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार का पुन्हा पुढे ढकलाव्या लागणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्याची सुरू झालेली प्रक्रिया अचानक थांबाबवी लागली होती. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्या ठिकाणी निवडणुकांची प्रक्रिया थांबली आहे. तेथून पुढे सुरू होईल असे स्पष्ट केलेले आहे.
दादासाहेब कांबळे-
निवडणूक निर्णय अधिकारी सोमेश्वर कारखाना
अजून तरी काही राज्य शासनाचा निवडणूक लागण्याबाबत कोणताही आदेश नाही मात्र ३१ ऑगस्ट पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होता. त्यामुळे उद्या साखर कारखान्याच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. प्रशासकीय स्तरावरील सर्व यंत्रणा तयार असून ज्या ठिकाणी निवडणुक प्रक्रिया थांबली आहे. तेथून पुढे निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.