सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने कारखाने तरतूद केलेला २० कोटीचा चढ उतार निधी प्रकल्पासाठी पूर्ण न वापरता कारखान्याकडे शिल्लक असणारा ४ कोटी ९३ लाख ४४ हजार चा संभावित निधी वापरावा. जेणे करून चढ उतार निधीतील ५ कोटी रुपये शिल्लक राहतील. असे मत शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले. हा विस्तारवाढ प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुन्हा २० कोटीच्या चढ उतार निधीची तरतूद करावी. कारण यानंतर कारखान्यावर ३५५ कोटीचे कर्ज होणार आहे. याचा परिणाम उसाच्या भावावर होणार आहे.
राज्य सरकार दोन करार करत आहे २७००० सभासदांचा करार होनार आहे तो भविष्यात घातक ठरनार आहे ऊस बीलातुन वसुलीचा घाट राज्य सरकार करनार आहे तसेच वसुली जर करून दिली नाही तर १०% रिबीट ठोकनार आहे हे घातक आहे
COMMENTS