सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : प्रतिनिधी
पुढच्या हंगामात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे धुरांड स्वबळावर पेटलच पाहिजे कारखान्याची अवस्था बघता निवडणूक परवडणारी नाही म्हणून प्रतापगडची निवडणूक बिनविरोध करा अशी सूचना जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज झालेल्या बैठकीत केली.
जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असून निवडणुकीत एकवीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांनी पुढाकार घेतला होता मागच्या आठवड्यात जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती त्याला अनुसरून पवार यांनी आजची बैठक मुंबई येथे बोलावली होती या बैठकीला आ शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ,कारखान्याच्या चेअरपर्सन सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे,योगेश गोळे,अमित कदम उपस्थित होते मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे झालेल्या या बैठकीत जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतापगडची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा केली तसेच कारखान्याच्या सद्य स्थिती बाबत माहिती घेतली आ शशिकांत शिंदे यांना निर्देश करून पवार यांनी प्रतापगडची निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली व सुनेत्रा शिंदे व सौरभ शिंदे यांना सहकार्य करण्याबाबत सांगितले आ शशिकांत शिंदे यांनी आम्ही सुनेत्रा व सौरभ शिंदे यांच्या सोबत असून कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पवार साहेबांना यावेळी दिले . प्रतापगड बिनविरोध झाल्यानंतर किसनवीरचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्या सोबत एक बैठक घेऊन असलेल्या कराराबाबत चर्चा करून काहीतरी मार्ग काढण्यात येईल व कोणत्याही परिस्थितीत पुढच्या गळीत हंगामात स्वबळावर प्रतापगड चालू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन जेष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी बैठकीत दिले व प्रतापगडची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्व नेत्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले .
प्रतापगड कारखान्यासाठी दीपक पवार यांच्या उमेदवारांनी पुणे विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे अपील दाखल केले होते ते अपील सहसंचालकांनी फेटाळून लावले आहे त्यामुळे आता महिला राखीव गटातून सौरभ शिंदे गटाच्या दोन महिला बिनविरोध होणार आहेत तसेच सर्व अर्ज सौरभ शिंदे गटाचेच राहिल्याने मेढा गटातून एक व सोसायटी गटातून एक उमेदवार बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे निवडणुकीपूर्वीच दीपक पवार गटाला हा हादरा बसला आहे.
-------------------
कारखान्याचे दोनशे-अडीचशे कामगार, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हितासाठी मी आमदार असताना आदरणीय लालसिंगराव काकांना युती सरकारच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केले होते. आणि आज ही माझा तोच प्रयत्न आहे. कारखाना कोणाकडे आहे. ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, मला राजकारणात फायदा झाला नाही. तरी चालेल पण तालुक्याच्या भल्यासाठी प्रतापगड कारखाना सुरू होणे गरजेचे आहे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्याकडे जे जे प्रयत्न केले,दोन बैठका लावल्या त्या प्रयत्नांना यश येण्याची आशा निर्माण झाली आहे
COMMENTS