उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील पश्चिम भागाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या उद्घाटन तथा भूमिपूजन होत आहे .
निंबुत येथील एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी सांगितले की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांना जोडणारा नीरा बारामती हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण सुरू होणार असून या रस्त्यालगत अतिक्रमण करू नये सार्वजनिक बांधकाम खात्याने जारी केलेल्या नियमानुसारच बांधकामे करावीत असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे जेणेकरून रुंद रस्ता रुंदीकरणात अतिक्रमणे काढण्याची वेळ येणार नाही .