सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत आहे. ईडीच्या कारवाईची आकडेवारी समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात ईडीने २९७० छापे टाकले ९४५ गुन्हे दाखल केले आहेत. या आकडेवारी वरुन कोणालातरी राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी याचा वापर होत आहे. गेल्या पाच वर्षात इथं असलेल्या कुणालाही ईडी नावाची संस्था माहीत नव्हती पण आता ईडी गावागावात पोहोचली असल्याची मत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त करत केंद्रीय तपास यंत्रणांची खिल्ली उडवली.
सद्या साखर कएखान्यांची परिस्थिती पाहता एकरकमी एफआरपी देण्यासाठी करखान्यांना कृत्रिम कर्जाचा फुगवटा करावा लागणार आहे. तरच साखर कारखाने एकरकमी एफआरपी देऊ शकतात असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता बारामती येथील सोमेश्वर कारखान्याला खा. पवार यांनी अचानक भेट देत कारखान्याची पाहणी केली. डिस्टलरी, सहवीजनिर्मिती प्रकल्प, साखर कारखान्याची विस्तारवाढ याची खा. पवार यांनी पाहणी केली.
यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, अजय कदम, लक्ष्मण गोफने, सुनील भगत, जितेंद्र निगडे, प्रणिता खोमणे, प्रवीण कांबळे, अनंत तांबे, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, रणजित मोरे, सचिव कालिदास निकम, दीपक निंबाळकर, योगीराज नांदखिले, बापूराव गायकवाड, भारत खोमणे, विराज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कारखान्यात चाललेल्या विविध विकास कामांची माहिती दिली, खा. पवार यांनी कारखान्यावर सद्या किती कर्ज आहे अशी विचारणा केल्यावर अध्यक्ष जगताप यांनी त्याबाबत खुलासा केला. कारखान्याच्या शिक्षण संस्थेचे चौकशी केल्यानंतर खा. पवार म्हणाले, उद्या ऑक्सफर्ड इन्व्हर्सिटी बरोबर करार होत असून सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती कारखाना व शरदनागर या ठिकाणी ऑक्सफोडर इनवर्षी चा अभ्यासक्रम शिकायला मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संचालक ऋषी गायकवाड यांनी अजितदादांनी आम्हाला तरुण पिढीला संचालक पदाची संधी दिल्याबद्दल खा. पवार यांचे आभार मानले यावर खा. पवार म्हणले,
अजितचं काम एकदम चोख असतं. मी जरी राज्यातील इतर कामात लक्ष देत असलो तरी अजितच खूप बारीक बारीक गोष्टीत लक्ष असतं. विकासकामे, स्वच्छता, झाडे याबाबत याबाबतीत अजितच खूप बारीक लक्ष असतं असे खा. पवार म्हणाले.
COMMENTS