सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे - प्रतिनिधी
बारामतीत तालुक्यातील जिरायती भागास वरदायनि असणाऱ्या जानाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुपे परगण्यान चाळीस दिवस मिळावे असे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोऱ्हाळे येथील कार्यक्रमात देण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने देऊळगाव रसाळ, जळगाव , नारोळी , कोळोली , शेरेवाडी , बाबुर्डी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी , आंबी खुर्द, वढाणे , बोरकरवाडी, चांदगुडेवाडी, खंडूखैरेवाडी या सर्व टोकांच्या असणाऱ्या गावांना सुमारे चाळीस दिवसीय जानाई आवर्तन मिळाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही तसेच या टोकांवरील गावांना हे आवर्तन न मिळाल्यास टॅकरचा मागणी निर्माण होऊ शकते अशी माहिती देण्यात आली.
सुपे आणी परीसरात सध्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने वरवंड तलावात लवकरात लवकर पाणी सोडून जानाई योजना सुरू करण्यात यावी तसेच चाळीस दिवसाचे आवर्तन मिळावे जेणेकरून प्रत्येक गावाला पाणी मिळेल असं विनंतीचे निवेदन सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे तसेच बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, राजकुमार लव्हे यांनी काल बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आणि दादांच्या आदेशानुसार संध्याकाळी लगेच वरवंड तलावात पाणी चालू करण्यात आले असून येत्या चार ते पाच दीवासात जानाई योजना सूरू होणार आहे गेल्या वेळेस जो भाग पैसै भरून वंचित राहीला आहे अशांना पाणी चालू झाल्यानंतर प्राधान्य देण्यात येणार असल्याचे संबंधित योजनेचे अधिकारी यांनी सांगितले.
COMMENTS