धरण क्षेत्रातील पाऊस ओसरला..! वीर पाठोपाठ गुंजवणी ८० टक्यांवर : भाटघर, नीरा देवधर ५० टक्क्यांच्या पुढे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील वीर धरण सद्या ९८ टक्के भरले असून त्यापाठोपाठ गुंजवणी ८० टक्के भरले आहे. भाटघर आणि नीरा देवधर ने ५० टक्क्यांची सरासरी ओलांडत अनुक्रमे ६० व ५३ टक्के भरली आहेत. 
       नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र काल पासून नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. 
          आज दि १८ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ४७७ मीमी पावसाची नोंद झाली असून ६०.०२ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात १०९० मीमी पावसाची नोंद झाली असून ५३.०८ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १५६ मी मी पावसाची नोंद झाली असून ९७.८३ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात १२४४ मी मी पावसाची नोंद झाली असून ७९.१४ टक्के धरण भरले आहे.
To Top