सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित 'गुरव समाज महाअधिवेशन' सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये रविवार ता.११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा.येथील शासकीय मैदान नेहरूनगर ,विजापूर रोड, सोलापूर येथे संपन्न होत आहे या अधिवेशनास सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र, गोवा, गुजरात, अशा राज्यातून 'गुरव समाज बांधव उपस्थित राहणार असे गुरव समाजाचे प्रदेशाध्यक्ष यशवंत ढेपे यांनी बोलताना सांगीतले .
ते पुढे म्हणाले की,'लोकशाही मध्ये लोकसंख्येला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने राज्यकर्त्याच्या प्रत्येक निर्णयात 'संख्येचा' प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो आहे. गेल्या ७५ वर्षाच्या प्रवासात 'गुरव समाज' हा राज्य पातळीवर कधीच संघटित झालेला पाहायला मिळाला नाही! म्हणून पर्यायाने सरकारवर कधीच 'दबाव गट' निर्माण करू शकला नाही, म्हणूनच कोणत्याही सरकारने आता पर्यत या समाजाची कसलीच दख्खल घेतलेली नाही.या समाजाच्या मागण्या काय आहेत? याकडे गांभीर्याने आता पर्यत कधीच पाहिले गेले नाही अथवा त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न तर दूरच परंतु त्यांची साधी माहिती घेण्याचा प्रयत्न सुध्दा केला गेला नाही.म्हणून केवळ याचाच परिणाम म्हणून देशात संपूर्ण गुरव समाज अद्याप ही गरीबी मध्ये खितपत पडला गेला आहे. विकासापासून नाही परंतू त्याला राहयला जागा ना कसले घर सुध्दा नाही.विकास काय असतो ? हे माहितच नसल्याने लाखो वर्षे झाली तो त्या पासून दूर राहिला आहे. ज्याप्रमाणे मराठा समाज - दलित समाज यांनी आपल्या ताकतीचे प्रदर्शन करून अनेक वेळा सरकारला समाजासाठी निर्णय घ्यायला योग्य वेळी भाग पाडले. त्याच प्रमाणे आम्ही देखील आता गुरव समाजाच्या शक्तीचे विराट दर्शन देऊ आणी सरकारला आमचीही ताकदीचे दर्शन घडवून देऊ. आणी गुरव समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडू म्हणून या अधिवेशनाचे आयोजिन राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे यांनू केले असल्याचे ढेपे म्हणाले.
या सदरच्या अधिवेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस प्रमुख उपस्थीतीत होणार आहे.तरी तमाम सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र,कर्नाटक,आध्र येथील गुरव समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे.
COMMENTS