सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
ग्रामीण भागात गावचे गाव पण जपून राजकारण केले पाहिजे. काँग्रेस व भाजप हे दोन्ही मोठे पक्ष लहान पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या दहा वर्षात राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असेल असे मत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. नीरा ता.पुरंदर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्यशोधक समाज प्रबोधन राष्ट्रसंघटना व राष्ट्रीय समाज पक्ष पुरंदर तालुका यांच्या वतीने माजी खासदार महादेव जानकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा नीरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झाला. यावेळी जानकर यांंना ५५ हजार लोकनिधी संकलन करून देण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी संजय निगडे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते, माऊली सरगर,पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर, सातारा जि. अध्यक्ष खंडेराव सरक, किरण गोपणे, पश्चिम महाराष्ट्र समन्वय सचिन गुरव, अँड.संजय माने, तानाजी शिंगाडे, निलेश लांडगे, विषाणु गोरे, अंकुश देवडकर आदी उपस्थित होते. नीरा शावसेनेचे दयानंद चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते यांनी जानकर यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
संजय निगडे मित्रपरिवाराच्या वतीने कर्नलवाडीचे माजी सरपंच सुधीर निगडे, पृथ्वीराज निगडे, दयानंद चव्हाण, प्रमोद निगडे, सत्यवान निगडे, धनराज कोंडे, दत्तात्रय निगडे, राहुल निगडे यांच्या हस्ते ५५ हजार रुपयांची माळ जानकर यांना भेट देण्यात आली. कर्यक्रमाचे प्रास्ताविक संजय निगडे यांनी केले. सुत्रसंचलन विनायक रुपनवर तर आभार शेखर खरात यांनी मानले.