सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सातारा जिल्हयामध्ये वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदा चोरटी दारु विक्री करणारे १) अशोक वामन जाधव, वय ५५ वर्षे, २) सविता अशोक जाधव वय ४८ वर्षे, ३) अमर अशोक जाधव, वय ५५ वर्षे, ४) अमित अशोक जाधव, वय १९ वर्षे, सर्व रा. देगांव यांचेवर सातारा जिल्हयामध्ये टोळीने बेकायदा दारूची चोरटी विक्री करणे, गंभीर दुखापत पोहचवणे बाबतचे यांचेवर गुन्हे दाखल असल्याने भुईंज पोलीस ठाणेचं प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रमेश गजे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे केला होता. सदर अहवालाची चौकशी डी वाय एस पी भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती. या टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे ते सातत्याने गुन्हे करत होते. त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई
करणेची मागणी होत होती. वरील टोळीला समीर शेख हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्यासमोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातून दोन वर्षाांकरीता
हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून १४ उपद्रवी टोळयांमधील ४६ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्रीमती
आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो. हवा प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे,
ग.पो.कॉ. अनुराधा सणस, भुईंज पोलीस ठाणेचे पो.कॉ सांगनाथ बल्लाळ, सागर गोहीते यांनी योग्य पुरावा सादर केला होता.