सुपे परगणा l निवडणुकीत जे बोललो... ते शंभर दिवसात करुन दाखवलं : उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील बोरकरवाडी तलावात पाईपलाईनद्वारे जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले. यावेळी निवडणुकित जे बोललो ते शंभर दिवसात करुन दाखवलं असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर सभेत सांगितले.
       बोरकरवाडी तलावात आलेल्या पाण्याचे जलपुजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 
         येथील सुमारे १३०० मिटर पाईपलाईन टी.सी.एस. फौडेशनच्या सी. एस. आर. निधीतून सुमारे २ कोटी ९० लाख खर्चाचे काम करण्यात आले आहे. जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या उजवा कालवा ते बोरकरवाडी तलावापर्यत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. मात्र त्यातील राहिलेले २०० मिटरचे काम निधी मिळताच लवकरच पुर्ण करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले. 
      विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बोरकरवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जानाई उपसा सिंचन योजनेतील पाणी पाईपलाईनद्वारे बोरकरवाडीच्या तलावात आणून सोडण्याचे पवार यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार हे पाणी आणून बोरकरवाडी तलावात सोडण्याचे काम शंभर दिवसांमध्येच पूर्णही करून दाखवलं असल्याचे त्यांनी सांगितले.
       तसेच सुप्यातील प्रारुप विकास आराखड्यामध्ये काहीच्या जागा जात आहेत. त्या गरिबांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. कारण विकास कामे करताना अडचणीं येतातच मात्र त्यातुन मार्ग काढावा लागतो असे पवार यांनी सांगितले. 
        काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही.....
     सुप्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काका कुतवळ यांना पवार म्हणाले, मी त्या एका रस्त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला, तहसीलदार आणि पीआयला सांगितलं आहे. त्यांना म्हणलं काकालाही विश्वासात घ्या. कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही.
       अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तेवढ्यात अजित पवारांच्या लक्षात आले ते म्हणाले अहो काका कुतवळ. नाही तर लगेच तुम्ही म्हणाल, दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत. असं उपमुख्यमंत्री अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.
         
       ............................................
To Top