सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
शासनाने महाज्योतीच्या माध्यमातुन शिक्षणाच्याबाबतीत जे उद्दिष्ट्ये ठेवले आहे. ते उद्दिष्ट्ये तसेच सुखसुविधा विद्यार्थ्यांपर्यत पोहचाव्यात, मात्र सरकार याबाबत उदासीन असल्याचे मत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका नाभिक संघटना, श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्था, कै. प्रदीप कृष्णाजी यादव व कै. सौ. शालन यादव ट्रस्ट, वीरभाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी आदींच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधू-वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संत सेनामहाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शुरवीर शिवाजी काशिद व जिवाजी महाले आदींच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण दळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे होते.
यावेळी दळे म्हणाले की, बारामतीकरांनी राबविलेला वधुवर सुचक मेळावा हा आदर्शवत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांनी याचे अनुकरण करण्याची आवश्कता असल्याचे सांगितले. तर राज्यशासनाने ओबीसीकरीता महाज्योती आयोग स्थापन केला. मात्र या माध्यमातुन अद्यापही ओबीसी विद्यार्थ्यांना सुख सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तर केंद्र सरकारने रोहिणी आयोगाची निर्मिती केली. मात्र संविधानाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे उपेक्षित वर्गाला अद्यापही न्याय मिळाला नसल्याचे दळे यांनी सांगितले. यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरक्षक वीर जीवा महाले तसेच स्वातंत्र्य सेनानी वीरभाई कोतवाल आदींचे स्मारक त्वरित उभारावे असे दळे यांनी सांगितले. यावेळी लवकरच संघटना बांधणी करण्यात येणार असुन तरुणांना संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजवर्धन शिंदे यांना नाभिक समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की यासंदर्भात काही मागण्यांची पुर्तता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन लवकरच करण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश राऊत, उपाध्यक्ष सुनील जगताप, शहराध्यक्ष सुधाकर माने, जिल्हाध्यक्ष अशोक मगर, मंगल आढाव, तालुकाध्यक्ष धिरण पवार, राजश्री जगताप, गणेश काशिद, महेश वारुळे, नवनाथ आपुणे किरण चौधरी, रविंद्र सूर्यवंशी, सुनील माने, किरण कर्वे, अनिल दळवी, हेमंत जाधव,
वधू वर सूचक मेळाव्याकामी सुधाकर माने, धिरन पवार, प्रा. दत्तात्रय जाधव, प्रा. डॉ. सुरेश साळुंके, हेमंत जाधव तसेच महेंद्र यादव, ह. भ. प. राधेश्याम साळुंके, आकाश काळे, सागर राऊत, संतोष साळुंखे, श्रीशकुमार शिंदे आदींचे सहकार्य मिळाले. यावेळी बारामतीच्या शहर व ग्रामीण भागातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. सुरेश साळुंके यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत पवार यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शहर संघटनेच्यावतीने करण्यात आले. तर आभार सुदाम कढणे यांनी मानले.
............................