सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरसह जिल्ह्याच्या इतर भागात आवकाळी पावसाचा तरकारी तसेच पालेभाज्यांना तडाका बसल्याने शेतातच बहुतांशी प्रमाणात तरकारी सडून गेली.याचा परिणाम आठवडे बाजारावर होऊन तरकारीची आवक घटल्याने भोरच्या मंगळवार आठवडे बाजार चांगलाच कडाडला.
भोरच्या आठवडे बाजारात पुरंदर, फलटण, लोणंद ,खंडाळा, वाई येथून व्यापारी तर भोर तालुक्यातील शेतकरी तरकारी विक्रीसाठी येत असतात.कडक उन्हाळा व पावसामुळे तरकारीची आवक घटली परिणामी व्यापाऱ्यांना पालेभाज्या तसेच इतर सरकारी खरेदी करणे महागात पडल्याने तरकारीचे बाजारभाव अचानक वाढले.बाजारात वर्षभरात कधी नव्हे ते गवार,भेंडी ,शेंग, कारले,शेवगा,वांगी,टोमॅटो यांना पावशरला ३० रुपये तर कोथंबीर, माठ भाजी,मेथी,पालक यांना जुडीला ६० रुपये बाजार मिळाला.आठवडे बाजार असल्याने पालेभाज्या तसेच सरकारी खरेदी करणे गरजेचे असते..ज्यादा चे पैसे देऊन बाजार खरेदी करावा लागला यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे नेरे येथील ग्राहक प्रकाश कदम यांनी सांगितले.तर बाजारातील व्यापारी संभाजी थोपटे म्हणाले जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला या पावसात तरकारी व पालेभाज्या सोडून गेल्या.त्यामुळे तरकारीची बाजारात आवक कमी झाली.दरम्यान बाजार भाव वाढले असल्याने मंगळवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांना ज्यादा चा भाव देऊन सरकारी खरेदी करावी लागली.