Bhor News l संतोष म्हस्के l जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिमझिम...पेरणी केलेल्या शेतात पाणी..तर उर्वरित पेरण्यांना अडथळा : खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर खरीप पिकांच्या पेरणीला जोर आल्याने शेतकऱ्यांनी लगबग करून दोन ते तीन दिवसात बहुतांशी पेरणी केली.मात्र पुन्हा रिमझिम पावसाने सलग पाच ते सहा दिवसांपासून सुरुवात केली.शेतात पाणी साचल्याने जमिनीचा वाफसा गेला.परिणामी उर्वरित यांना पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे.
         शेतकरी रिमझिम पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत असला तरी पाऊस थांबत नसल्याने खरीपातील पिकांच्या पेरण्या होणार की नाही या द्विधा अवस्थेत आहे.पावसाने उघडीत दिली तर पुढील पाच ते सहा दिवसात उर्वरित खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.मात्र पाऊस थांबलाच नाही तर कडधान्य पेरणी होणार नाही.परिणामी बियाणे विकत घेण्याची परिस्थिती नसतानाही बहुतांशी शेतकऱ्यांनी एकमेकांकडून उसने पिसे घेऊन विकतचे आणलेले कडधान्याचे बियाणे घरात पडून राहणार असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी ग्रामदैवतांना पाऊस थांबण्यासाठी साखळी घालत असल्याचे चित्र आहे.मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत.मात्र उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.एकीकडे मागील पंधरा दिवसांपूर्वी पाऊस पडेना म्हणून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्या पाऊस थांबता थांबेना म्हणून अडचणीत आलेला शेतकरी हवालदील झाला आहे असे उत्रोली येथील शेतकरी शिवाजी शेटे यांनी सांगितले.
Tags
To Top