सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : संदीप आढाव
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन युवा संचालकांना चेअरमन व्हायचे होते पण त्यांचे नाव जाहीर केले असते तर पॅनल विजयी होण्यासाठी धोका निर्माण झाला असता. या दोन भावी युवा संचालकांना जेष्ठ व इतरांचा असलेल्या विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःचे नाव चेअरमनपदी घोषणा करण्याची खेळी केली असली तरी हि प्रत्यक्ष निवडणुक झालेवरच हेच युवा संचालक चेअरमन असतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
पाहुणेवाडी ता.बारामती येथे सत्ताधारी श्री निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी चेअरमन पदासाठी स्वतःच्या नावाची घोषणा केली.वास्तविक ते इच्छा असणाऱ्या दोन प्रबळ युवा संचालकांच्या पैकी एकाचे नाव घोषित करतील अशी अपेक्षा होती. मात्र अंतर्गत घडामोडींमुळे त्यांनी स्वतःचे नाव जाहीर केले.
दरम्यान या दोन युवा संचालकांना निवडणुकीची सर्व जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे.हे दोन युवा संचालक संपूर्ण निवडणुकीचा होणारा खर्च उचलणार आहेत. यामुळे जरी चेअरमन पदासाठी नाव जाहीर केले नसले तरी हि प्रत्यक्ष निवडणुक झालेवरच आपले नाव चेअरमन पदासाठी पुढे येऊ शकते यामुळे दोन्ही युवा संचालक कामाला लागले आहेत.