सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील चांबळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती सागर कामठे यांचा कार्येकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी निवडणुक होऊन स्वाती राजेंद्र कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा सरपंच व निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ विठ्ठल कामठे यांनी जाहीर केली.
या वेळी ज्योती कामठे, संजय कामठे, मनिषा कामठे, प्रतिभा कदम, मारुती कामठे, ग्रामसेवक राखी ढगारे, बाळासाहेब कामठे, विलास कामठे, कैलास कामठे, शहाजी कामठे, संदिप कदम,चैत्राली कामठे, सुजाता कामठे, लक्ष्मण कामठे, रेखा कामठे, अनिता पवार आदीसह चांबळीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
माझ्या उपसरपंच पदाच्या काळात शासनाकडून आलेल्या योजना शेतकरी, महिला सर्वसामान्य नागरीकापर्यत पोहचवण्यासाठी गावातील ज्येष्ठ पदाधिकारी यांची सहमती घेऊन काम करणार असल्याचे नुतन उपसरपंच स्वाती कामठे यांनीसांगितले.