सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
छत्रपती शिवरायांच्या कालावधीपासून राजगड किल्ल्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पुणे जिल्ह्यातील या महत्त्वाच्या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.
किल्ले राजगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था, मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास चोरघे यांच्या वतीने रविवार (ता. ८), सोमवारी (ता. ९) केले होते. त्यावेळी शेळके बोलत होते.
दरम्यान शनिवारी राज सदर ते पद्मावती देवी मंदिरापर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यानंतर गड पूजन करण्यात आले. रात्री पद्मावती देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम झाला. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी राजगड पायथ्याशी खंडोबा माळावर बाल कीर्तनकार यांचे भजन, शिवचारित्र्य पोवाडा, विविध सत्कार, ढोल पथकांचे खेळ यासह विविध कार्यक्रम झाले.
यावेळी मिलिंद एकबोटे, उद्योजक मनोज मांढरे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, अंकुश दसवडकर, कुमार केसरी संग्राम दसवडकर, रोहिदास चोरघे, दिगंबर चोरघे, सोपान चोरघे, रवींद्र घाडगे, विकास भिकुले, राजू झांजे, पृथ्वीराज थोपटे,शिवराज शेंडकर, गणेश जागडे,विनायक लिम्हण, अमोल गायकवाड, विजय सणस, शरद पिलाणे, गोरख शिर्के , पृथ्वीराज दसवडकर, अनिकेत व्यवहारे,उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले.