सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी मान्सूनने दडी मारल्याने भोर तालुक्यातील निरा- देवघर तसेच भाटघर धरणातील पाणी पातळीने तळ गाठला आहे.भाटघर धरणात सध्या ७.५ टक्के पाणीसाठा राहिला आहे.दरम्यान धरण पूर्णता मोकळे झाल्याने धरणातील गणेश मूर्ती उघड्यावर पडले आहेत.
अनेक वर्षांपासून भाटघर धरणात परिसरातील अनेक गावांमधील गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जन करीत असतात.
बहुतांशी मूर्ती पाण्यात विरघळून जात असतात तर काही बाप्पांच्या मूर्ती तशाच राहत असल्याने धरणातील पाणी पातळी घातल्यानंतर त्या उघड्यावर पडत असतात.मागील वर्षी याच मूर्ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिसू लागल्या होत्या.
मात्र यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाण्यात विसर्जन केलेली गणेश मूर्ती उघड्यावर आली आहे.धरण क्षेत्रात मागील आठ ते नऊ महिन्यांपूर्वी विसर्जन केलेल्या अनेक गणेश मूर्तीपैकी एकच मूर्ती न विरघळता जशीच्या तशी राहिल्याने भक्तांच्या मनात भाव निर्माण होऊन सद्यस्थितीला भाटघर धरणातील उघडी पडलेली बाप्पांची मूर्ती पाहण्यासाठी भावी भक्त धरण परिसरात गर्दी करू लागल्याचे चित्र आहे.
